Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चुकीचे काम करणाराच माफी मागतो : मोदींच्या माफीनाम्यावर राहुल गांधींची टीका

सांगली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मादी मागितली होती त

नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक; १४२ कोटींची तरतूद
ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार : गृह राज्यमंत्री योगेश कदम
बिबट्यांची नसबंदी, वन्यजीव हल्ल्याच्या नुकसान भरपाईत कोंबड्यांचा समावेश करावा :आमदार सत्यजीत तांबे

सांगली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मादी मागितली होती त्याचा समाचार घेतला. राहुल गांधी म्हणाले की, पतंगराव कदम यांनी 60 वर्षे समाजकारण केले. पण केव्हाही माफी मागितली नाही. कारण त्यांनी कोणतेही चुकीचे काम केले नाही. म्हणजे चुकीचे काम करणारा माणूसच माफी मागतो. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. मोदींनी माफी का मागितली याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे या पुतळ्याचे काम संघाच्या कार्यकर्त्याला कंत्राट देण्याचा त्यांना पश्‍चाताप असावा. त्यामुळे मोदींनी माफी मागितली असावी. दुसरे कारण म्हणजे पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार किंवा चोरी झाली असावी. कदाचित त्यामुळे मोदींनी माफी मागितली असावी. तिसरे कारण म्हणजे, त्यांनी महाराजांच्या सन्मानार्थ पुतळा उभा केला, पण ती फार काळ टिकली नाही म्हणून त्यांनी माफी मागितली असावी, असे राहुल गांधी म्हणाले.

COMMENTS