पुरंदरेंच्या लिखाणातून शिवरायांवर अन्याय : शरद पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरंदरेंच्या लिखाणातून शिवरायांवर अन्याय : शरद पवार

पुणे : दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, त्यांचे लिखाण, त्यांची पुस्तके मला कधीच पटली नाही. कारण त्यांच्या लिखाणांतून कायमच छत्रपती शिवाजी महाराजांव

आनंदाचा शिध्याचं अखेर ठरलं ; जिल्ह्यातील सात लाख ८२ हजार कुटुंबांना मिळणार लाभ
वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनची तीन पट व्यवस्था करावी

पुणे : दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, त्यांचे लिखाण, त्यांची पुस्तके मला कधीच पटली नाही. कारण त्यांच्या लिखाणांतून कायमच छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला, अशी भूमिका राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात मांडली. श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात रामदास यांचे योगदान काय? दादोजी कोंडदेवचे योगदान काय? अशा अनेकजणांचे संबंध जाणीवपूर्वक जोडले गेले. दादोजी कोंडदेव व शिवाजी महाराजांचा कोणताही संबंध नव्हता. राजेंना दिशा देण्याचे काम जिजाऊ माता यांनी केले. इतिहासातील अनेक सत्य गोष्टी अनेकांना न पटणार्‍या आहेत. त्यामुळे मी खोलात जात नाही.

COMMENTS