Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कन्नड तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

कन्नड ः सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून हताश झालेल्या जामडी जहागीर (ता.कन्नड ) येथील शेतकर्‍याने पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या के

बारावीमध्ये नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
गर्लफ्रेंडने 1 लाख मागितल्याने प्रियकराची आत्महत्या
एफटीआयच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या.

कन्नड ः सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून हताश झालेल्या जामडी जहागीर (ता.कन्नड ) येथील शेतकर्‍याने पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तम अण्णा जाधव (55) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, अशी एक ओळ लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळून आली आहे. उत्तम जाधव हे कुटुंबासह जामडी जहागीर शिवारात असलेल्या (गट क्रमांक 111) या शेतात राहतात. त्यांना तीन एकर शेती आहे. अल्प व सततच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले.

COMMENTS