Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 हवामान बदलामुळे भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव 

 सांगली प्रतिनिधी - हवामान बदलामुळे भाजीपाला पिकावर अनिष्ट परिणाम होत आहे. थ्रिप्स , मावा, तुडतुडे, करपा , डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सा

कोपरगाव तालुक्यात 44 हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन
माण तालुक्यातील उसाला तुरे; साखर कारखान्या अभावी उस उत्पादक चिंतेत
कृष्णा नदीकाठी 8 फूटी मगर विश्रांतीला, प्रशासन सतर्क

 सांगली प्रतिनिधी – हवामान बदलामुळे भाजीपाला पिकावर अनिष्ट परिणाम होत आहे. थ्रिप्स , मावा, तुडतुडे, करपा , डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यात वाढत्या थंडीमुळे तसेच पडत असलेल्या धुक्यामुळे भाजीपाला पिकावर अनिष्ट परिणाम होत असून भाजीपाला पिकावर  थ्रिप्स , मावा, तुडतुडे, करपा , डाऊनी, भुऱ्या या जातीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.  यामुळे भाजीपाला पिकावर सर्रास औषध फवारणीचे काम सध्या सुरू असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. हवामान बदलामुळे काही वेळा थंडी वाढत आहे.  त्यामुळे सकाळच्या प्रहरी धुके पडत आहे.  यामुळे नदीकाठच्या शिवारात धुके असल्याचे चित्र सकाळच्या वेळी दिसत आहे.  त्यामुळे कलिंगड या पिकावर डाऊनी तसेच थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे.

COMMENTS