आष्टी प्रतिनिधी - महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तत्कालीन जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी माझ्या मतदार संघातील खुंटेफळ साठवण तलावासाठी 14.

आष्टी प्रतिनिधी – महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तत्कालीन जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी माझ्या मतदार संघातील खुंटेफळ साठवण तलावासाठी 14.68 कोटी रूपये मंजूर करून या कामांचे टेडंरही फ्लॅश करण्यात आले होते परंतु विद्येमान सरकारने यावर फक्त 150 कोटी रूपये निधी दिला.
त्यातील 100 कोटी निधी पुन्हा मार्च अखेरीस लॅप्स होणार आहे.पुढच्यावर्षी फक्त 50 कोटीच निधी उपलब्ध राहिल.या खुंटेफीळ साठवण तलावाच्या बाबतीत सरकार उदासीन असून,फक्त वेळकाढूपणा करत असल्याचे आ.बाळासाहेब आजबे यांनी विधानसभेत सांगत सरकारवर टिका केली. विधानसभा अधिवेशनात दि.15 बुधवार रोजी आ.आजबे यांना प्रश्न मांडण्यांची संधी मिळाली यामध्ये त्यांनी मतदार संघातील पाणी,विज,शेती या विषयी प्रश्न उपस्थित करून, सरकारने यावर मतदार संघातील जनतेचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली.पुढे बोलतांना ते म्हणाले की,आष्टी तालुक्यातील जनतेच्या हिताची आणि महत्वकांक्षी असलेली खुंटेफळ साठवण योजनेला तत्कालीन जलसंपदामंञी जंयत पाटील यांनी 14.68 कोटी रूपायांचा निधी मंजूर करून त्या योजनेचे टेंडरही फ्लॅश करण्यात आले होते.परंतु आत्ता आलेल्या ईडी सरकारने हे काम तात्पुरत्या स्वरूपात रद्द करून ठेवले आहे.त्यामुळे आमचा आष्टी तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणुन ओळख राहणार आहे यात कसलेही दुमत नाही. लोक हिताची कामे या सरकारकडून स्थगित करण्यात आले आहेत आष्टी, पाटोदा,शिरूर तालुक्यातील 33 के.व्ही.चे कामेही प्रलबिंत आहेत ते ही उर्जामंञी साहेबांनी मार्गी लावाव्यात. मतदारसंघातील आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात अनेक तलाव हे जुने झाले असून या तलावा संबंधित कालव्याचे दुरुस्ती होणे आवश्यक आहे कालवे दुरुस्त नसल्यामुळे शेतकर्यांना त्यातील पाण्याचा योग्य प्रमाणात उपयोग होत नाही त्यामुळे या कामालाही सरकारने मंजुरी द्यावी .220 केव्हीचे सब स्टेशन तात्काळ मंजूर करून मतदारसंघातील विजेचा प्रश्न मा, ऊर्जामंत्री महोदयांनी सोडवावा अशी मागणी यावेळी आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी विधानसभेत बोलताना केली.यासह विविध प्रश्नावर आ, आजबेंनी विधानसभेत मतदार संघातील प्रश्न मांडून सरकारने मार्गी लाववावेत अशी मागणी केली.
COMMENTS