Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषद सभापतींची निवड याच अधिवेशनात ?

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेचे सभापती पद रिक्त आहेत. उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे याच सभापतीचा कारभार पाहत आहे. मात्र या पावसाळी अध

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक
निर्णायक टप्प्यात, पूर्वेचे पाणी पश्‍चिमेला वळवणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेचे सभापती पद रिक्त आहेत. उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे याच सभापतीचा कारभार पाहत आहे. मात्र या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र संख्याबळाचा विचार केल्यास आणि महायुतीच्या सरकारने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावाला मंजुरी दिल्यास याच अधिवेशनात सभापतीची निवड होण्याची शक्यता आहे.
या पार्श्‍वभूमीवर सभापतीची निवड आणि 12 आमदारांच्या निवडीसंदर्भात मंगळवारी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली असून त्यामध्ये विधानपरिषदेच्या सभापती निवडीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्याबाबत पुढील काळात काय करता येईल याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

विधानपरिषदेत जास्तीत जास्त संख्याबळ करण्यासाठी सर्व रिक्त जागा भरण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू आहेत. राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबतचा घोळ गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून असल्याचं दिसून येतंय.  राज्यात महाविकास आघाडी सरकरा सत्तेत आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 सदस्यांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांकडून या यादीला ना हिरवा कंदील देण्यात आला, ना यादी मंजूर करण्याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलं. या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे सरकारकडून नवीन यादी सादर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याचवेळी दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही  राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. विधानपरिषदेतील सभापती पद रिक्त आहे. याबाबत लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहेत.

राज्यपालनियुक्त 12 आमदारांचा सुटणार तिढा – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यापासून राज्यपालनियुक्त 12 आमदारांचा प्रश्‍न अजूनही सुटला नाही. महाविकास आघाडीने दिलेल्या 12 नावाला तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूरी दिली नव्हती. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानंतर महायुतीने नव्याने 12 नावाची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. मात्र तरीही राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेत या नावांना मंजुरी देण्याची मागणी केल्याचे समजते. त्यामुळे राज्यपालांनी जर मंजुरी दिली तर, राज्यपालनियुक्त आमदारांचा तिढा सुटू शकतो.

सभापतीपदासाठी प्रा. राम शिंदे यांचे नाव चर्चेत ? – जर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावाला राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यास विधान परिषदेत महायुतीच्या आमदारांची संख्या वाढू शकते. असे झाल्यास भाजपचा आमदार सभापतीपदी विराजमान होवू शकतो. त्यासोबतच भाजपकडून सभापती पदासाठी विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा विचार देखील सुरू असल्याचे समजते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा नवे पद मिळू शकते. मात्र त्यासंदर्भात भाजपच्या नेत्याकडून अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

COMMENTS