मुंबई : काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणुकीत 25 लाखांची मतचोरी झाल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याचा समाचार घेतांना मुख्यमंत्री देव

मुंबई : काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणुकीत 25 लाखांची मतचोरी झाल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याचा समाचार घेतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी म्हणाले की, राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब हा छोटा फटाका ठरला, त्यात कोणताही दम नव्हता. राहुल गांधी यांचे वक्तव्य केवळ राजकीय स्टंट आहेत आणि त्यांचा उद्देश देशातील लोकशाही संस्थांवर शंका निर्माण करणे हा आहे. त्यांचा अजेंडा हा अशा काही परदेशी शक्तींशी जुळतो, ज्यांना भारताची लोकशाही व्यवस्थित चालू राहू नये असं वाटते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

COMMENTS