Maharashtra News : महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारस
Maharashtra News : महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, पन्हाळ्यासह 11 किल्ले आहेत तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे.
Maharashtra Forts In World Heritage List : कोणत्या किल्ल्यांचा यादीत समावेश
रायगड
राजगड
प्रतापगड
पन्हाळा
शिवनेरी
लोहगड
साल्हेर
सिंधुदुर्ग
विजयदुर्ग
सुवर्णदुर्ग
खांदेरी
जिंजी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युनेस्कोच्या या निर्णयाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची गोष्ट ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.


COMMENTS