Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलपुनर्भरण चळवळ गतिमान करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे सरसावल्या

जलपुनर्भरण ही लोकचळवळ झाली पाहीजे- जिल्हाधिकारी

परळी प्रतिनिधी - जलपुनर्भरण ही चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे. परळी शहर व तालुक्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जल पुनर्भरण करावे. जेणेकरून पाण्याची कस

मंदिर रिकामे, कोविड सेंटर फुल्ल!
वर्धा जिल्ह्यात वीजांच्या कडकडासह जोरदार पाऊस 
होर्डिंगचा प्रश्‍न हा केवळ मुंबईचाच नाही तर संपूर्ण राज्याचा

परळी प्रतिनिधी – जलपुनर्भरण ही चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे. परळी शहर व तालुक्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जल पुनर्भरण करावे. जेणेकरून पाण्याची कसलीही टंचाई जाणवणार नाही. तसेच जल पुनर्भरण मोहिमेसाठी परळीतील डॉक्टरांनी जनजागृती करावी. असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी परळी येथे डॉक्टर व हॉटेल व्यवसायिक यांच्याशी संवाद साधताना नगर परिषदेच्या सभागृहात केले.
या वेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, कार्यालयीन सचिव संतोष रोडे, अभियंता वामन जाधव, पाणीपुरवठा अभियंता प्रफुल्ल साळवे आदिची व्यासपीठावर उपस्थिती होती.   या प्रसंगी जल पुनर्भरणाचे महत्त्व विशद करताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे  म्हणाल्या की, परळीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात येणार्‍या काळात पाणीटंचाई जाणू नये तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी.वेस्ट जाणारे पाणी जमिनीत मुरावे. पाणी जमीनीत मुरुन पाणीपातळीत वाढ झाली पाहिजे. यासाठी  शहरातील डॉक्टर व व्यावसायिकांनी आपल्या कुपनलिका घरांचे घराचे छत, घरातील आड, विहीरींचे जल पुनर्रभरण करुन घ्यावे तसेच इतरांनाही या मोहिमेसाठी प्रवर्त करावे. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक जलपुनर्भरण करतील. परळी शहरात येणार्या काळात पाऊस कमी झाला तरी जमीनीतील पाणीपातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण अत्यंत महत्वाचं आहे. जलपुनर्भरण होत नसल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी कमी होणे म्हणजे एका प्रकारे दुष्काळात निमंत्रणच म्हणावे लागेल. ही परिस्थिती परळी शहरात निर्माण होऊ नये म्हणून रेनवॉटर हॉर्वेस्टिंग या माध्यमातून जनजागृती करून इमारती, घरांच्या छतावर चे पाणी एकत्र साठवून शोष खड्याच्या माध्यमातून जमिनीत जिरवायला पाहिजे. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यास जलपुनर्भरण म्हणून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग चा प्रयोग मोठ्या प्रमाणवर अमलात आणण्यासाठी विशेषता डॉक्टरांनी व व्यावसायिकांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन यावेळी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले.

COMMENTS