Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीच्या बांधावरून तिघांवर प्राणघातक हल्ला

तलवाडा प्रतिनिधी - तलवाड्याजवळ देवीतांडा येथील दोन भाऊ व पुतण्या हे तीन लोक शेतीमध्ये चक्कर मारण्यास गेले असता त्यांच्याशेजारील अंकुश खवाटे,गंगा

नेपाळमध्ये 4.5 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
मनसेने घातला महाविकास आघाडी सरकार पुतळ्यास दारूचा अभिषेक
ग्रामपंचायत निवडणूकीस यात्रा कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवा : पालकमंत्री

तलवाडा प्रतिनिधी – तलवाड्याजवळ देवीतांडा येथील दोन भाऊ व पुतण्या हे तीन लोक शेतीमध्ये चक्कर मारण्यास गेले असता त्यांच्याशेजारील अंकुश खवाटे,गंगा खवाटे व इतर 3-4लोकांनी मिळुन शेतीच्या बांधाचे कारण करून देवितांडा येथील  डिंगाबर मिठु राठोड, महादेव मिठु राठोड  व कैलास देविदास  राठोड यांना शेतीच्या बांधावरून खवाटे कुटुंबातील 4,5 मिळुन लोखंडी रॉडने, काठीने अंगावर वळ येईपर्यंत  मारहाण केली आहे त्यातील डिंगाबर राठोड यांच्या डोक्यात जास्त मार लागल्यामुळे प्रकृती चिंताजनक आहे त्यांना उपचारासाठी तलवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल असता डॉ.काकडसर यांनी पुढील उपचार साठी बीड सरकारी रुग्णालयात पाठविले आहे तरी हे तिघेजण  बीडच्या सरकारी दवाखान्यांमध्ये  मृत्यूशी झुंजदेत आहे.

COMMENTS