Homeताज्या बातम्यादेश

लग्नकार्यास निघालेल्या वऱ्हाडाच्या बसला अपघात, ७ ठार अनेक जखमी

आंध्र प्रदेश प्रतिनिधी - आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. दर्शनीजवळ लग्नाच्या वऱ्हाडांनी भरलेली बस अनियंत्रित ह

सांगली जिल्ह्यात भरधाव कार रसवंतीगृहात घुसून एका शाळकरी मुलाचा मृत्यू
मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी.
टायर फुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

आंध्र प्रदेश प्रतिनिधी – आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. दर्शनीजवळ लग्नाच्या वऱ्हाडांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन सागर कालव्यात पडली. या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बसमध्ये 35 ते 40 जण प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या रिसेप्शनसाठी काकीनाडा येथे जाण्यासाठी लग्नाच्या मंडळींनी आरटीसी बस भाड्याने घेतली होती. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

COMMENTS