बस बंद शाळा सुरु ..? विध्यार्थांची शासनाला उध्दिग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू केल्या आहेत शाळेत जाण्यासाठी दळणवळण व्यवस्था नसल्य
बस बंद शाळा सुरु ..?
विध्यार्थांची शासनाला उध्दिग्न प्रतिक्रिया
महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू केल्या आहेत शाळेत जाण्यासाठी दळणवळण व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनेही बंद आहे . खाजगी वाहन आणि शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना परवडत नसल्यामुळे कोरणामुळे खाजगी वाहने ही पूर्ण क्षमतेने चालू झाले नाहीत. आपल्या मुलाला शाळेत कसे पाठवायचे हा प्रश्न पालकांपुढे पडला आहे. पाथर्डी तालुक्यात शिक्षणासाठी पाथडी पूर्व भागातील अनेक विद्यार्थी आहेत . शाळेत जाण्यासाठी शाळेच्या वेळेवर बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे अडचणी निर्माण झाले आहेत. खरवंडी कासार येथील भालगाव या गावांमध्ये सकाळी ६ वाजता भालगाव येथुन जाणारी बस व तीच बस सायंकाळी मुक्कामी ब्रम्हनाथ येळम येत होती. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी सोय होत होती.. परंतु ती आता बंद आहे त्यामुळे ती बस पुन्हा सुरू करावी असे आव्हान भालगाव चे माजी सरपंच अंकुश कासुळे यांनी केले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेला पोहोचता येईल
प्रतिक्रिया – शाळेच्या वेळेवर एसटी बस सुरू नसल्यामुळे काही विद्यार्थी शाळेत येत नाहीत, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे एसटी महामंडळाने बस सेवा सुरू केली तर हे विद्यार्थी शाळेत पोहोचतील त्यामुळे लवकरच बस सेवा सुरू करावी
विनायक किर्तने , प्राथमिक शिक्षक
COMMENTS