सातारा प्रतिनिधी - राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधी आमदारांना विकास निधी देताना हे सरकार राजकारण करत आहे. या विरोधात आक्रमक होत र

सातारा प्रतिनिधी – राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधी आमदारांना विकास निधी देताना हे सरकार राजकारण करत आहे. या विरोधात आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज हजारो कार्यकर्त्यांना घेऊन सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लाठी मोर्चा काढला. या पुढील काळात राजकारण करून जर विरोधी पक्षातील आमदारांची कामे थांबवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून झाल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी या आंदोलनाच्या वेळी दिला.
COMMENTS