Homeताज्या बातम्या

अवकाळी पावसाने भाज्या नासल्या, दरही घसरले

शेतकऱ्यांसोबत व्यापारीही संकटात

नवीमुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दिवसाला साडे तीनशे ते चारशे भाज्यांच्या गाड्यांची आवक होती. ती आता शंभरने कमी झाली आहे. अवका

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
सातारा बँक निवडणुकीत सातारचे दोन्ही राजे बिनविरोध; 11 संचालक बिनविरोध
शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार, महावितरण आणि राज्य शासनाने आणली योजना 

नवीमुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दिवसाला साडे तीनशे ते चारशे भाज्यांच्या गाड्यांची आवक होती. ती आता शंभरने कमी झाली आहे. अवकाळी पावसाने भाज्या खराब झाल्याने गाड्यांची आवकही घटली आणि दरही घसरले, त्यात येणाऱ्या मालाला बाजारपेठ मिळत नसल्याने माल तसाच पडून राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांच नुकसान तर झालेच मात्र व्यापारीही संकटात सापडला आहे. या भाज्यांमध्ये पाले भाज्या खराब झाल्या असून, यात मेथी, कोथिंबीर सह इतर पालेभाज्यांचा समावेश आहे. त्यामुळे अवकाळी पावसाच्या तडाख्यात होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याने सगळेच हवालदिल झाले आहेत.

COMMENTS