Homeमहाराष्ट्रनाशिक

रामतीर्थ गोदावरी सेवा समिती तर्फे यंदाचा  राष्ट्रजीवन सन्मान  – थोर कृषी तज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा यांना जाहीर 

नाशिक :  पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्त्वाला समर्पित जीवनकार्य करणारे, भारतीय शेती, माती आणि शाश्वत विकास यासाठी आयुष्य वाहिलेले थोर कृषी तज्ज्ञ पद्म

शिक्षक मतदार संघ चार नामनिर्देशन अर्ज दाखल
सिन्नर तालुक्यात शांतिगिरीजी महाराजांचे नागरिकांनी केले उत्फुर्त स्वागत 
महाविद्यालयाच्या आवारात तरुणांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा
नाशिक :  पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्त्वाला समर्पित जीवनकार्य करणारे, भारतीय शेती, माती आणि शाश्वत विकास यासाठी आयुष्य वाहिलेले थोर कृषी तज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा यांना गोदा राष्ट्रजीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार भारत सरकारचे सांस्कृतिक कार्य व पर्यटन मंत्री श्रीमान गजेंद्रसिंह शेखावत यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असून, हा क्षण नासिकच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाला वंदनीय शांताकुमारी (प्रमुख संचालिका – राष्ट्र सेविका समिती) यांचे मार्गदर्शन लाभणार असून, मा. सौ. विजया ताई रहाटकर (अध्यक्षा – राष्ट्रीय महिला आयोग) यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे. तसेच पूज्य गौरांग प्रभुजी (प्रमुख मार्गदर्शक – इस्कॉन) यांचे आध्यात्मिक आशीर्वाद या महोत्सवाला लाभणार आहेत.
या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून ११११ महिलांची भव्य गोदा महाआरती आयोजित करण्यात येत आहे. या महाआरतीत परिचारिका, डॉक्टर, वैद्य, अभियंता, पोलीस खात्यातील महिला, महिला वकील, कामगार वर्गातील महिला  वनवासी क्षेत्रातील युवती  यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मातृशक्तीचा सहभाग असणार आहे. तसेच विविध जाती, संस्था, संघटना व सामाजिक घटकांतील महिलांचा सहभाग हे या महाआरतीचे वैशिष्ट्य असून, समरसतेचे जिवंत चित्र या माध्यमातून समाजासमोर उभे राहणार आहे.
ही गोदा महाआरती नासिक शहरातील आजवरची अत्यंत भव्य,व्यापक आणि सर्वसमावेशक महिला सहभाग असलेली आरती ठरणार असून, नासिक शहराच्या सर्व भागांतून मोठ्या संख्येने महिला या पवित्र उपक्रमात सहभागी होतील, असा समितीचा संकल्प आहे. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, नासिक शहरातील विविध भागांमध्ये महिलांसाठी गोदा महाआरतीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण वर्ग केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित नसून, त्यातून शिस्त, संस्कार, सामूहिकता आणि सांस्कृतिक जाणिवेचे संस्कार घडवले जात आहेत.
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव आध्यात्म, राष्ट्रजीवन,पर्यावरण आणि सामाजिक समरसता यांचा सुंदर संगम ठरणार असून, नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात एक नवा, प्रेरणादायी अध्याय जोडणारा ठरेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS