Homeताज्या बातम्यासंपादकीय

आगीत न वितळणारे ब्लॅक बॉक्स सांगतील अपघाताचे कारण !

 काल अहमदाबादहून लंडनसाठी निघालेल्या बोईंग ७८७ या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. विमानातील २४२ प्रवासी आणि मेंबर क्रू व कॅप्टन पैकी २४१ लोकांचा मृ

ऑस्ट्रेलियामध्ये हैदराबादच्या महिलेची हत्या
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
महार रेजिमेन्टचा वर्धापन महोत्सव उत्साहात संपन्न  

 काल अहमदाबादहून लंडनसाठी निघालेल्या बोईंग ७८७ या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. विमानातील २४२ प्रवासी आणि मेंबर क्रू व कॅप्टन पैकी २४१ लोकांचा मृत्यू झाला; तर, अवघा एक व्यक्ती सुरेश कुमार विश्वास जो इंग्लंडचा नागरिक आहे, तो अतिशय आश्चर्यजनकरीत्या अपघातातून बचावला. या अपघाताच्या तांत्रिक कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण, जे शेवटच्या क्षणाला कॅप्टनने संपर्क यंत्रणेला सांगितलं होतं, ते म्हणजे दोन्ही इंजिन या विमानाचे निकामी झाले होते. अर्थात, बोईंग सारख्या अतिशय अवजड आणि प्रथितयश कंपनीच्या या विमानांची दोन्ही इंजन एकाच वेळी निकामी होऊ शकत नाही; असा एक तांत्रिक अंदाज आहे. परंतु, विमानाचा जो ब्लॅक बॉक्स आहे, या ब्लॅक बॉक्समध्ये विमान अपघाताच्या साऱ्या कंडिशन्स या रेकॉर्ड होत असतात आणि हा ब्लॅक बॉक्स कोणत्याही प्रकारच्या आगीत भस्मसात होऊ शकत नाही किंवा त्याच्यात आग जाऊ शकत नाही! वास्तविक, काल अहमदाबादला कोसळलेल्या या विमानाच्या आगीच्या ज्वालामुळे ८०० ते १००० डिग्री सेल्सिअस च्या अग्नीज्वाळा निर्माण झाल्या; तरीही, या अग्निज्वालांमध्ये ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही किंवा त्याच्या आत मध्ये आग जाऊ शकत नाही, असे अनेक तज्ञांनी सांगितले. कितीही डिग्री सेल्सिअसची आग असली तरी ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित राहतो. त्यामध्ये विमान अपघाताची नेमकी काय कारण काय आहेत, अंतिम क्षणात कॉकपीट मधले कॅप्टन आणि सहकर्मचारी काय संवाद करत होती, या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतात. त्यामुळे अपघात का आणि कसा झाला, याची कारणं ब्लॅक बॉक्सच्या चौकशीनंतरच समोर येतील. विमान एअरपोर्टवरून उड्डाण घेत असताना म्हणजे टेकऑफ करत असताना, विमानाचे एकूण वजन, विमानात असलेले इंधन, विमानात असलेले प्रवासी, सर्व प्रवाशांच्या ४६ किलो सरासरी वजनाच्या प्रवासी बॅगा, याबरोबरच हवेचा दाब या सगळ्या वजनाला एकाच वेळी उचलून धरणारी एक शक्ती विमानात एकाच वेळी निर्माण व्हावी लागते. ती शक्ती इंजिनच्या माध्यमातून निर्माण होते. परंतु, या विमानाचे दोन्ही इंजिन फेल झाल्यामुळे ही शक्ती विमानात निर्माण झाली नाही. त्यामुळे पायलटने म्हणजे विमानाच्या कप्तानाने अंतिम समई जी दोन वाक्य त्यांच्या संपर्क यंत्रणेशी सांगितली, त्यामध्ये सर्वात पहिलं कारण त्यांनी दिलं की, विमानाने उड्डाण करण्याची शक्ती गमावलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी मेडे या शब्दाचे उच्चारण केलं. हा शब्द फ्रेंच भाषेतून आलेला आहे. फ्रेंच भाषेमध्ये मे एडर या शब्दाचा अर्थ या आणि मदत करा असा होतो. त्यामुळे मेडे हा शब्द वापरण्याची परंपरा विमान यंत्रणेमध्ये किंवा त्या प्रवास यंत्रणेमध्ये पडलेली आहे. त्यामुळे कप्तान आणि शेवटचे तीन शब्द जी मेडे म्हणून वापरली, त्याचा अर्थ आता बचावाचा कोणताही उपाय राहिलेला नाही; योग्य ती तुम्ही मदत करा; परंतु शक्यता जवळपास सर्वच नाहीशा झालेल्या आहेत. याचा अर्थ हे शब्द म्हणजे कप्तानाने उच्चारलेले निर्वाणीचे शब्द असतात. अर्थात, या शब्दांना उच्चार त्यांना कप्तानाला त्याचा मृत्यूही समोर दिसत असतो. बऱ्याच वेळी भाषिक वाक्प्रचारांमध्ये असा शब्द वापरला जातो, जहाज बुडत असताना सर्वात शेवटी मृत्यूला सामोरा जातो, तो म्हणजे कप्तान. त्यामुळे अख्ख जहाज बुडताना तो जसा पाहत असतो, तसा विमान प्रवासामध्ये सर्वात शेवटचा धोका जो कळतो तो कप्तानाला. मात्र, संपर्क यंत्रणेला कप्तान ते कळवत असतो आणि तो त्या संकटाला शेवटच्या साहसाने सामोरा जातो. परंतु, याची कल्पना अन्य प्रवाशांना त्याच क्षणाला येईलच, असं नाही. अर्थात कोणताही कप्तान हा शेवटच्या क्षणापर्यंत विमान आणि विमानाचे प्रवासी वाचवण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु, हमदाबादच्या सरदार पटेल एअरपोर्टवरून सुटलेल्या या विमानात कप्तानाला टेक ऑफ करण्यासाठी जी काही सेकंद मिळाली आहेत, त्यामध्ये कप्तानाने योग्य तो निर्णय घेतलेला असला, तरीही,  यंत्रांनी कप्तानाला मदत केलेली दिसत नाही. त्यामुळे हा अपघात पूर्णपणे यांत्रिक आणि तांत्रिक बिघाडाचा असावा, असा प्राथमिक अंदाज सर्वच तज्ञ लावताहेत. परंतु, यथावकाश ब्लॅक बॉक्स सापडलेले आहेत, त्यामुळे त्यांना पूर्ण तपासून योग्य ती कारणं जगासमोर येतील.

COMMENTS