Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सलग 11 व्यांदा व्याजदर जैसै थे !; विकासदर 6.6 टक्के राहण्याचा अंदाज

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे कर्जदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सलग 11 व्यांदा व्

पुढील 15 दिवसांत स्वगृही परतणार ः एकनाथ खडसे
चलनप्रतिमाचे राजकारण
अमित शाह यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्ष जुन्या शिवसेना-भाजपा युतीचा तुकडा पडला…

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे कर्जदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सलग 11 व्यांदा व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे रेपो रेट हा 6.5 टक्क्यांवर कायम असेल. सध्याची वाढती महागाई पाहता यावेळी आरबीआय आपल्या रेपो रेटमध्ये कपात करून सामान्यांना दिलासा देईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र यावेळेस देखील कर्जदारांची निराशा झाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, यावेळीही आरबीआयने रेपोरेट कायम ठेवला आहे. त्यामुळे सलग 11 व्यांदा आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच आर्थिक विकास दर 6.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

COMMENTS