Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 44 कोटी रुपये

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

जामखेड ः  गेल्या वर्षी अतितिवृष्टी आणि हवामान बदलामुळे झालेल्या खरीप पिकाच्या नुकसानीचे 44 कोटी रूपये जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात ज

धनजंय जाधव शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंधसाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना
मोहटादेवी देवस्थान येथे कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू

जामखेड ः  गेल्या वर्षी अतितिवृष्टी आणि हवामान बदलामुळे झालेल्या खरीप पिकाच्या नुकसानीचे 44 कोटी रूपये जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहेत. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. मागील वर्षी हवामान बदलामुळे आणि पीक काढणीच्या वेळेस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पिकविमा भरण्यासाठी राज्य सरकारने 1 रुपयात पिकविमा भऱण्याची योजना आणली परंतु विमा भरताना शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामळे रोहित पवार यांनी त्यांची यत्रंणा प्रत्येक गावांमध्ये राबवून या यंत्रणेमार्फत शेतकर्‍यांचे फॉर्म भरून घेतले त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पिकविमा उतरवणारे सर्वाधिक शेतकरी हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील होते. पिकविम्याचे फॉर्म भरून घेतल्यानंतर खरीप हंगामात अनेक पिकांचं नुकसान झाले तसेच पिक काढणी पश्‍चात झालेल्या नुकसान भरपाईचीही शेतकर्‍यांची मागणी होती. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी शासन आणि विमा कंपन्यांकडे नियमित पाठपुरावा केला. त्यानुसार त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि अखेर जामखेड तालुक्यासाठी 44 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहेत. सध्या खरीप पिक हंगामात पेरणी सुरु असून हे पैसे जमा झाल्याने शेतकर्‍यांना बियाणे, खते खरेदीसाठी या पैसाचा उपयोग होईल. झाल्यानंतर लगेचच रोहित पवार यांनी शासनाकडे नियमित पाठपुरावा केला, त्यासंदर्भात अधिकार्‍यांच्या बैठाका घेतल्या, अधिवेशनावेळी देखील त्यांनी कृषीमंत्री व वित्तमंत्री यांच्याशी याबाबत वारंवार संवाद साधला होता आणि त्यामुळे तेव्हा कर्जत-जामखेड व नगर जिल्ह्याचे मिळून 190 कोटी शेतकर्‍यांना मिळाले होते.

सरकार मार्फत पिकविमा उतरवला जातो परंतु नंतर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यास अनेक अडचणी येतात. यासंदर्भात मी अधिवेशनामध्ये व व्यक्तीशः अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी बँकेत जाऊन आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत चौकशी करावी आणि काही अडचण असल्यास माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा*.
रोहित पवार, (आमदार कर्जत-जामखेड विधानसभा)

COMMENTS