Homeताज्या बातम्याअहमदनगर

राष्ट्रवादीने कायम पाण्याबाबत भेदभाव केला : राम शिंदे

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पंधरा वर्षे सत्तेत असतांना जामखेडच्या भूतवड तलावासाठी कसलाही निधी दिला नाही. इतिहास साक्षीला आहे कुकडीच्या पाणी वाटपासह

कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात
नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड : राम शिंदे
सीनाचे आवर्तन सोडण्याचे आ. राम शिंदे यांचे आदेश

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पंधरा वर्षे सत्तेत असतांना जामखेडच्या भूतवड तलावासाठी कसलाही निधी दिला नाही. इतिहास साक्षीला आहे कुकडीच्या पाणी वाटपासह जामखेड शहर व तालुक्यातील २७ कोटींच्या पाण्याच्या कामाला सापत्नभावाची वागणूक देत नीधी न देणे, योजना रद्द करणे असे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींचा सोशलमिडियावर विकास चालू त्यामुळे त्यांना बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नसल्याने ते याप्रश्री स्वतः बोलायला टाळत आहेत. अशी टिका प्रा. राम शिंदे यांनी आ रोहित पवारांचे नाव न घेता टीका केली.
जामखेड शहराला वरदान ठरलेला भूतवडा तलावासह जोड तलाव पुर्ण क्षमतेने भरला आहे. या पाण्याचे जलपुजन माजीमंत्री प्रा.शिंदे यांच्या हस्ते झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिप सदस्य सोमनाथ पाचारणे. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले. रवी सुरवसे,मनोज कुलकर्णी, बाजीराव गोपाळघरे, अमोल राळेभात,गोरख घनवट, अभिजीत राळेभात, सोमनाथ राळेभात, अमित चिंतामणी,बिभीषण धनवडे,आशोक गिते, प्रविण चोरडिया उध्दव हुलगुंडे आदी उपस्थित होते
पुढे प्रा.शिंदे म्हणाले, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातर्गत ३ कोटी २२ लाख रुपये नीधीच्या जोड तलावाच्या कामाचा शुभारंभ ६ मे १९९९ रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाला. मात्र राज्यात सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने नंतर १५ वर्षात या तलावाच्या कामाला निधीच न देण्याचे पाप केल्याने हे काम अपुर्ण राहिले.मात्र २०१४ ला आपण मंत्री झाल्यानंतर या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेत निधी मिळवून काम पूर्ण केले. जोड तलावामुळे तलावाची साठवण क्षमता दिडपटने वाढली.भाजपा युती सरकारच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ५ कोटी ६ लाख २७ हजार रूपये खर्चाची जामखेड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ दिवंगत मुंडे यांच्या हस्ते झाला होता.मात्र ही पाणीपुरवठा योजनाही नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने रद्द केल्या. तालुक्यातील खर्डा तसेच अन्य विविध गावांच्या २७ कोटीच्या योजना रद्द करण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केले.
जामखेड शहरासाठी उजनीवरून पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी आपण पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतली.मात्र याचे श्रेय मला मिळेल म्हणून,विद्यमान लोकप्रतिनिधींनी तब्बल दोन वर्ष ही योजना प्रलंबीत ठेवली.ही योजना दोन वर्ष प्रलंबीत का ठेवली ? याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी देणे गरजेचे आहे. मात्र याचे उत्तर देण्याचे ते सोईस्कर टाळत आहेत.
जामखेडला कुकडीचे पाणी मागितल्यानंतर कुकडी प्रकल्पातील पाण्याचे नियोजन झाल्याने पाणी देता येत नसल्याचे तत्कालिन पाटबंधारेमंत्री अजित पवार यांनी सांगून, पाणी देण्याचे टाळले आहे.मात्र आपल्या मंत्री पदाच्या काळात तुकाई उपसा सिंचन योजना व जवळा आणि आगी बंधा-याचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून , कर्जत जामखेड तालुक्याला हक्काचे कुकडीचे पाणी मिळविले. असे राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज विद्यमान लोकप्रतिनिधींनी तुकाई उपसा सिंचन योजना गुंडाळुन ठेवली आहे.तर कुकडीचे आर्वतण पाण्यासाठी कर्जत तालुका कायम आसुसलेला ठेवला आहे.जवळा ,आगी बंधा-यात अद्यापही कुकडीचे पाणी आलेले नाही

COMMENTS