महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांबाबत बेरकी कळवळा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांबाबत बेरकी कळवळा

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी  महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबत महाराष्ट्र बंद ठेवला. शेतकऱ्यांबाबत कळवळा होता की, त्यातुन राजकारण साध

आयजीच्या जीवावर बायजी उदार; महाविकास आघाडीचा भंकस कारभार
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण.. जिवे ठार मारण्याची धमकी (Video)
महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी 

महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबत महाराष्ट्र बंद ठेवला. शेतकऱ्यांबाबत कळवळा होता की, त्यातुन राजकारण साधायचे होते. जर शेतकऱ्यांबाबत कळवळा असेल तर  राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे पुर्णतः दुर्लक्ष का केले आहे. असा सवाल करत  अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या  समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे आदींसह संबंधित विभागाच्या सचिवांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे.

              क्रांतीसेनेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेश मधील घटनेचा निषेध करत ११ आक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र बंद केला.शेतकऱ्यांबाबत सत्ताधारी राज्यकर्त्यांना किती कळवळा आहे. हे या बंद मधुन दाखवून द्यायचे होते की, त्यातुन राजकारण साधायचे होते.सरकारला शेतकऱ्यांचा खरच कळवळा असेल तर  याबाबत सरकारचे शेतकरी या नात्याने आभार व्यक्त केले आहे. यातुन आपले सरकार हे शेतकऱ्यांचे कैवारी आहे, हे सिद्ध झाले आहे. परंतु अखिल भारतीय क्रांतीसेनेनेच्या माध्यमातून गेल्या वर्ष- दीड वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी शासकीय स्तरावर मोजणी करण्यासाठी, दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला दुध दर वाढीसाठी, राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याबाबत, राज्यातील शेतकऱ्यांना मोफत सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळण्याबाबत, राहुरी तालुक्यातील कोंढवड-तांदुळवाडी येथील मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी, राहुरी तालुक्यातील कांदा बियाणे फसवणूक प्रकरणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळुन संबंधित बियाणे कंपनीवर कारवाई करण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मागण्या केल्या आहे. वरील शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात गेली एक-दीड वर्षांपासून वेळोवेळी पाठपुरावा करून ही महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसुन येत नाही. आपण पाठवलेल्या पत्र व्यवहार वरून संबंधित खात्यांकडुन कुठलिही कारवाई आतापर्यंत झाली नाही.शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेतली जात नसेल तर हे सरकार शेतकऱ्यांचे कैवारी कसे म्हणता येईल.      

                    सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबत महाराष्ट्र बंद ठेवला. मृत पावलेल्या शेतकऱ्यांबाबत हळहळ व्यक्त केली. त्यातुन शेतकऱ्यांचे हे कैवारी असलेले हे सरकार आहे. परंतू प्रत्यक्षात माञ वेगळेच आहे शेतकऱ्याच्या कोणत्याच प्रश्नाकडे हे सरकार लक्षदेत नाही. राज्यातील शेतकरी कोरोना काळापासून शेत मालाला योग्य हमीभाव व शेतीपुरक व्यवसायाला मिळत असलेल्या दरांमुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व गोष्टींमुळे बऱ्याच   शेतकऱ्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. राज्यातील शेतकरी मरणयातना भोगत असताना या सरकारने पिकांना पाण्याची गरज असताना भर उन्हाळ्यात शेतीपंपाचे वीज रोहित्र बंद करुन वीज बिलाची पठाणी वसुली केली. दुध दराबाबतही सरकारने योग्य निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे आपल्या सरकारचे पुर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

        महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याच्या  प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष भागचंद औताडे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, संघटक जालिंदर शेडगे, जिल्हाध्यक्ष नवनाथ ढगे, सुभाष दरेकर, बाळासाहेब भोर, संदीप उंडे, भगवान पेरणे, शेखर पवार, सचिन गागरे, संदीप डेबरे, विठ्ठल शेजुळ, अविनाश कुरूमकर, अमित कोल्हे, शब्बीर शेख, गोकुळ नेटके, ऋषिकेश निबे, अंकुश भोसले, भाऊसाहेब पवार, नितीन खांदे, रोहीत शेटे, शाम तारडे, सुनील कोल्हे, सोमनाथ वने, हर्षद धोंडे आदींनी केली आहे.

COMMENTS