नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचे ‘हे’ आहे कारण… होतोय मोठा परिणाम

Homeताज्या बातम्याकृषी

नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचे ‘हे’ आहे कारण… होतोय मोठा परिणाम

प्रतीक्षा चांदेकर : अहमदनगर आज काळ आपण बघतो कि  आपल्या वागण्यामुळे  नैसर्गिक साधन संपतीचा ऱ्हास होत चला आहे  आणि त्याचा थेट परि

बिबी धरणाचे काम सुरू; शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण
शेतकऱ्यांना मालामाल होण्याची संधी… सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे लाखोंचे उत्पन्न… सरकारी योजना
महाबळेश्‍वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा

प्रतीक्षा चांदेकर : अहमदनगर

आज काळ आपण बघतो कि  आपल्या वागण्यामुळे  नैसर्गिक साधन संपतीचा ऱ्हास होत चला आहे  आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे ,आरोग्य म्हणजे नुसता आजाराचा अभाव नाही तर  मानसिक, आध्यात्मिक, शारीरिक, सामाजिकदृष्टीने संतुलित जीवन अशी जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या आहे.

आपण बघतो की, आज कोरोना सारख्या आजाराने संपूर्ण जग थांबले किबहुना संथ झाले आहे. आपल्या काही चुकांमुळे आपण वापरत असलेल्या अधिक नैसर्गिक साधन संपत्तीवर याचा परिणाम आपण बघत आहोत. या सर्वामध्ये अभाव जाणवतो की, पर्यावरणीय संतुलन जीवन, वायू, जल, ध्वनी असे विविध प्रकारचे प्रदूषण, अनियंत्रित वृक्षतोड, उत्सर्जन, अनियंत्रित बांधकाम, खराब अन्न धान्य, शेतीतील जंतुनाशके हे सर्व घटक या सर्वाना कारणीभूत आहेत .

निसर्ग आणि मानव त्या मध्ये घनिष्ट संबंध आहेत मानव आणि निसर्ग या मधले नाते हे अतूट आहे. निसर्गाशिवाय मानवला भविष्य नाही. आपण निसर्गाला जपलो नाही तर पुढील पिढीला भविष्य नाही. या सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत .

यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर आपण प्रयत्न केले पाहिजेत. प्रदूषण कमी होण्यासाठी सामाजिक संघ तयार करायला हवेत. युवकांना एकत्र घेऊन झाडी लावली पाहिजेत. शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरत असलेल्या खताचे प्रमाण कमी करणे आणि पाणी कसे जमिनीमध्ये जिरवता येईल या वर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

COMMENTS